Advertisement

१०-१२ दिवसांपासून नळाला पाणी नाही

१०-१२ दिवसांपासून नळाला पाणी नाही
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
ऐन उन्हाळयात नप प्रशासन नागरिकांच्या पाणी प्रश्नावर कोणतीही उपाययोजना करीत नाही. म्हणून शेवटी आंदोलन हाच पर्याय असल्याचा इशारा रहिवाशांनी पालिकेला निवेदनाद्वारे दिला आहे. शहरात १५-१५ दिवस नळाला पाणी सोडल्या जात नसल्याने नागरिक, माता-भगिनिंचे हाल पहावल्या जात नाही म्हणून आज सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन नगर पालिका अधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे पाणी प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी निवेदन दिले. येत्या दोन दिवसांत आमच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात आला नाही तर, तीव्र आंदोलन करून नगर पालिकेत शेकडोंच्या संख्येने महिलांचा घागर मोची आणल्या जाईल शुभम बोबडे, यशवंत नगर (सावजी फैल) मलकापूर यांच्या नेतृत्वात पालिकेला इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments