*राज्यासह जळगाव जामोद मतदारसंघात परिवर्तन घडणारच.* - महेबूब शेख,प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्ष.
दिनांक 4 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्ष जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने स्थानिक नगर परिषद सांस्कृतिक भवन येथे परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, तथा महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काळे हे होते.
गेल्या 20 वर्षापासुन जळगाव जामोद मतदार संघात भाजपाचे आमदार आहेत त्यांना आता जनता कंटाळली आहे लोकांना आता परिवर्तन हवय त्यासाठी या परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलेले आमदार गोवाहाटी जावून बॅग उचलून कुलीचं काम करतात असा घनाघाती आरोप महेबूब शेख यांनी केला, तसेच जळगाव जामोद मतदारसंघात एकत्रितपने परिवर्तन घडविण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्यात महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत महायुती सरकार फक्त आपली सत्ता वाचविण्यात गुंग असुन त्यांच महिला सुरक्षेकडे दुर्लक्ष झालंय. महिलाना लाडक्या बहिणी योजनेची नाहीतर सुरक्षित बहिणी योजनेची आवश्यकता आहे, महाविकास आघाडी सरकारने पारीत केलेला महिला सुरक्षतेसाठीचा शक्ती कायदा केंद्र सरकारने रोखून धरल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला.
प्रसेनजीत पाटिल हेच विधानसभा उमेदवारीचे दावेदार असुन सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
जळगाव जामोद मतदारसंघातील आमदारांचे जनतेच्या समस्येकडे अजिबात लक्ष नसून मतदार संघातील प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे,कचऱ्या पासून वीज निर्मितीचा प्रकल्प पडून आहे त्यातून 1 watt वीज सुद्धा निर्माण झाली नाही, असा आरोप प्रसेनजीत यांनी केला. मतदारसंघात एकत्रित काम करून भाजपाचा पराभव करू असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद सपकाळ यांनी केले तसेच संजय गाडेकर,संगीतराव भोंगळ, पराग अवचार, वर्षा वाघ यांची भाषणे झाली. पळशी सुपो येथील सरपंच उमेश कोकाटे, भाजपा कार्यकर्ते शरद कोकाटे, जळगाव जामोद येथील सामाजिक कार्यकर्ते तसलीम पठान, डॉ. तन्वीर खान, काँग्रेसचे अल्पसंख्यांक माजी शहराध्यक्ष राजू शेख यांच्यासह शेकडो आदिवासी तथा कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला.
मंचकावर प्रदेश सचिव आफताब शेख, अल्पसंख्यांक प्रदेश सचिव रफिक सेठ, एम.डी. साबीर, जियाउल हक,विश्वासराव भालेराव,महादेव भालतडक, शेख जावेद, ईरफान खान, संजय ढगे, राजेंद्र देशमुख, मोहसीन खान,विठ्ठल वाघ, आशिष वायझोडे, संजय चोपडे, दत्ता डिवरे, रवी मिस्कीन, एजाज देशमुख,सिद्धार्थ हेलोडे, अजहर पटेल, महादेव भारसाकळे, विठ्ठल घुले, अशोक गवळी,मंगल डोंगरदिवे यांच्यासह सभेला हजारो लोकांची उपस्थिती होती.
0 Comments