२२जुलैला राज्यात सार्वत्रिक अतिवृष्टि झाली त्यात बुलडाना जिल्ह्यातील संग्रामपूरआणि जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुराने थैमान घालुन अनेक घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व अमितसाहेब ठाकरे यांनी त्वरित पदाधिकाऱ्यांना मदत पोहचविण्याचे आदेश दिले . त्यानुसार मनसे राज्य उपाध्यक्ष मा. विठ्लराव लोखंडकार यांनी स्वतः येऊन चांगेफळ येथील रामायणाचार्य श्री रामभारती महाराज यांचे आश्रमात भेट देऊन त्यांचे समवेत व वाशिम जिल्हा अध्यक्ष राजू किडसे पाटील शैलेश गोंधणे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा संघटक विनोद टिकार जिल्हा उपाध्यक्ष शिवा लगर, जिल्हाध्यक्ष वाहतूक सेना, रवींद्र उन्हाळे शेगांव तालुका अध्यक्ष रवी वानखेडे शहर अध्यक्ष वाशिम ओमप्रकाश फड नितीन शिवलकर शिवा खोंड,तालुकाध्यक्ष संग्रामपूर,राजु राऊत, तालुकाध्यक्ष जळगाव जामोद, प्रतीक लोखंडकार भागवत उगले तालुका अध्यक्ष नांदुरा नागेश भटकर शहर अध्यक्ष जळगाव जामोद,परमेश्वर लाहुडकार गोपाल लांजुळकर अरुण धर्माळ अजय बेलोकार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत व्हावी या साठी वाशिम येथून राजु पाटील किडसे,जिल्हाध्यक्ष यांनी आणलेले जीवनोपयोगी स्टील चे भांडे साहित्याची किट वडशिंगी,मडाखेड, आसलगाव, धानोरा ,अकोली, येथील बाधित व गरजू पूरग्रस्तांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रत्यक्ष भेटून रामायणाचार्य रामभारती महाराज यांचे हस्ते मदतीचे वाटप केले.
यावेळी पुर ग्रस्तांच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी मा. राज साहेब ठाकरे यांनी ताबडतोब मदत पोहचविण्याचे आदेश देऊन नुकसान ग्रस्तांचे दुःख हलके करण्याचे काम केले त्याबद्दल रामायनाचार्य रामभरती महाराज यांनी राज साहेबांचे आभार मानले व त्यांच्या संपूर्ण टीमला आशीर्वाद दिले.
0 Comments