Advertisement

सुलज गावामध्ये कृषीदुतांनी केले वृक्षारोपण

प्रतिनिधी नागेश भटकर 
जळगाव जामोद तालुक्यातील गाव सुलज येथे स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद येथील बीएससी ऑनर्स उद्यानविद्या मधील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी रावे (ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव )उपक्रमांतर्गत" मेरी माटी, मेरा देश" व 15 ऑगस्ट क्रांती दिवसाचे अवचित्य साधून वृक्षारोपण केले आणि स्वातंत्र लढ्यातील वीरांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी सुलज ग्रामपंचायत कार्यालय व शाळेच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेचा प्राणांगणात, ग्रामपंचायत परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सरपंच लताबाई मधुकर टापरे, तसेच जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका लाभल्या आणि समस्त गावकरी मंडळी लाभली आणि तसेच सर्व उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तुषार भोपळे,चंद्रकांत बोबडे ,अभिषेक बोरकर सुयोग चोपडे, शिल्पक दाभाडे व गणेश देशमुख यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे,उपप्राचार्य सतीश धर्माळ कार्यक्रमाचे अधिकारी प्रा.प्रितेश वानखेडे,विषय तज्ञ प्रा.जिव्हेश साळी यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments