Advertisement

विद्यार्थ्यांसाठी तळमळ, शिक्षकांचे आत्मबळ शिक्षण विभागाला लागले रिक्त पदांचे ग्रहण शिक्षण सेना जळगावच्या वतीने गट शिक्षणअधिकारी यांना दिले निवेदन

प्रतिनिधी नागेश भटकर 
जळगाव जामोद येथील, शिक्षक सेना जळगावच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांना विविध समस्या सोडवण्यासाठी चे समस्या निवारण सभेसाठी वेळ देण्यासाठी निवेदन सादर.जळगांव (जामोद) तालुक्यामधील कार्यरत विविध शाळांवरील शिक्षकांच्या समस्या महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, जळगांवकडे प्राप्त झाल्या असून आज पर्यंत एकही समस्या निवारण सभा पंचायत समिती स्तरावर संपन्न झाली नाही.करिता महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना तालुका शाखा जळगांव (जामोद) ला समस्या निवारण सभेसाठी वेळ देण्यात यावा. अशा आशयाचे निवेदन मा गटशिक्षणाधिकारी यांच्या वतीने श्री. वानखडे साहेब ( अधिक्षक ) व श्री जोशी साहेब वरिष्ठसहाय्यक) यांना सादर करण्यात आले.निवेदन सादर करतेवेळी सुनील हिस्सल सर, उमेश खारोडे सर, संतोष वेरूळकर, आशिष चिंचोलकर, अनिल भगत व इतर शिक्षक सेना पदाधीकारी तथा शिलेदार उपस्थित होते.निवेदनावर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण भटकर, संपर्क प्रमुख गजानन काकडे, सरचिटणीस दिलीपकुमार वानखडे, कार्याध्यक्ष निलेश काळे,उपाध्यक्ष अमोल गई,संतोष वेरुळकर, सह संपर्क प्रमुख उमेश खारोडे, कोषाध्यक्ष आशिष चिंचोलकर,संदीप इंगले,प्रसिद्धी प्रमुख अनिल भगत यांच्या सह्या आहेत.ज्या शिक्षकांच्या समस्या असतील त्यांनी लेखी अथवा तोंडी स्वरूपात संघटनेकडे द्यावी,असे आवाहन शिक्षक सेनेच्या वतीने तालुक्यातील सर्व शिक्षकांना करण्यात आले आहे.अहिल्या न्युज 24, आवाज सातपुड्याचा घेणार शिक्षण विभागाचा आढावा.

Post a Comment

0 Comments