शेतकरी आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष जिवन भाऊ खवले यांनी चोहोट्टा बाजार येथे सर्व पक्षीय मराठा आरक्षण संबंधित बंद आंदोलनात आपले मराठा समाजाला आरक्षण न्याय मिळावा अशी भावना व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले हे सरकार मराठा समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे , मराठ्यांच्या मतांचा वापर हे सरकार करीत आहे जालना जिल्हा तिल अंतरवली सराटे या गावी झालेल्या लाठीचार्ज करुन अमानुष मारहाण करण्याची काय गरज होती? , जरांगे पाटील आंदोलनातुन मागीत असलेल्या मागण्या सरकार ने मान्य कराव्या व मराठा समाजाला आरक्षण न्याय मिळवून द्यावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये सरकार ला मराठा समाज जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही! यावेळी बोलत होते.
0 Comments