Advertisement

तलाठ्याने केला महिलेचा विनयभंग पोलिसात तक्रार दाखल .

प्रतिनिधी राजेश काळे
लोणार तहसील मधील वझर आघाव भुमराळा गावचे तलाठी प्रकाश अर्जुन डोईफोडे वय वर्ष ५३ वझर व भुमराळा या गावांमध्ये तलाठी म्हणून कार्यरत आहेत परंतु त्यांचे कारणामे असे काही भलतेच आहेत दिनांक २७/९/ २०२३ रोजी दुपारी ४वा. वझर आघाव येथे कार्यरत असलेले (तलाठी ) प्रकाश अर्जुन डोईफोडे वय . ५३ बिबी. यांनी पीडित महिला राहणार बिबी यांच्या घरी जाऊन सदर महिलेस मी तुला फोन करतो तू माझा फोन उचलत का नाही व माझ्यासोबत बोलत का नाही असे म्हणून महिलेचा वाईट उद्देशाने डावा हात धरून कवटाळून तिचा विनयभंग केला हा प्रकार महिलेच्या मुलाने पाहीला असता सदर आरोपीस त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित आरोपीने त्याला जी वे मारण्याची धमकी दिली व त्यानंतर पीडित महिलेने लगेच पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार पोलीस स्टेशन येथे सांगितला त्यानंतर बिबी पोलिसांनी रात्री १० वा ३५ मि. सदर आरोपी विरुद्ध कलम भा.द.वी ३५४′ ४५२ ‘५०४’ ५०६′ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी बीटचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश चव्हाण ब. नं .१७६५ पो ‘का “विनायक मोरे ब. नं २१८० हे पुढील तपास करीत आहे तसेच सदर तलाठी यांनी यापूर्वीसुद्धा ज्या शेतामध्ये विहिरी नाही त्या शेतामध्ये लक्ष्मी दर्शन करून त्या शेतामध्ये नोंदी करून दिलेले आहेत त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे ज्या शेतामध्ये विहिरी नाही त्या शेतामध्ये विहिरीची नोंद करून त्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे स्कीम सुद्धा घेतली आहे. असे सुद्धा पुरावे आमच्या हाती लागले त्यामुळे सदर तलाठी यांनी खूपच मोठे लक्ष्मी दर्शन केल्याचे दिसून येत आहे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर आहे त्यांना येते हेतु पुरस्कार टाळून नोंद न करणे हे सुद्धा यांचे कारणाने आहेत भुमराळा व वझर येथील शेतकऱ्यांनी यापूर्वी सौर ऊर्जा प्रकल्प घेऊन एका ठिकाणी चा सातबारा देऊन सदर प्रकल्प हा दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. व तलाठी साहेब यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता सदर तलाठी यांचा दूरध्वनी क्रमांक बंद आहे सदर तलाठी हे यापूर्वी भारतीय सैन्यात होते .

Post a Comment

0 Comments