Advertisement

सामाजिक सद्भावना,शांतता एकतेचे प्रतिक ; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चोहोट्टा बाजार चे गणेश विसर्जन शांततेत उत्साहात संपन्न.

अकोट प्रतिनिधी अमोल राणे
सामाजिक संदेश देणारा एकमेव सार्वजनिक गणेश उत्सव चोहोट्टा बाजार ( वार्ताहर ) भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांनी १८९४ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात केली. गणेशोत्सवाची परंपरा हि जनजागृती साठी उपयोगात आणायची होती.समाजाला एकसंघ करण्यासाठी गणेशोत्सव सुरु करण्यात आला. ऊत्सवाला ऊत्सवाचे रुप ठेवत लोकमान्यांचा ठेवा जतन न करता ऊत्सवाला केवळ एक राजकीय, आर्थिक कार्यक्रम करत शक्तीप्रदर्शनाचा देखावा बनला असुन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चोहोट्टा बाजार मात्र वरिल प्रकरणाला अपवाद आहे.१९८५ मध्ये या मंडळाची स्थापना स्व. शंकररावजी तुरुक,स्व.भिमरावजी बुंदे यांनी टिळकांचा उद्देश साध्य करण्यासाठी चोहोट्टा बाजार मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या नावाने सुरुवात केली. आज पुन्हा तिच परंपरा मंडळाने कायम राखली.
सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवापूर्वी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये कुठलाही राजकीय लवलेश नसलेला *सामाजिक सद्भावना,शांतता एकतेचे प्रतिक ; शांततेत उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियोजन करन्यात आले* या मध्ये संपूर्ण जबाबदारी नविन ऊत्साही मात्र सुशिक्षित अशा तरुन वर्गाकडे दिल्याने गावातील कार्यकर्त्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आढळून आला. गणेश विसर्जन व ईद ए मिलाद ऊन नबी ची मिरवणूक एकाच दिवशी येणार असल्याने गावात जरीही कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही परंतू परस्परांच्या उत्सवात सहभागी होण्याची हिंदू मुस्लिम परंपरा असल्याने गणेश विसर्जन एक दिवस उशिरा करन्याचे नियोजन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चोहोट्टा बाजार यांनी केले.
रविवार दिनांक १ ऑक्टोबर ला पहाटे पाच वाजता पासुन श्री च्या महाप्रसादाची तयारी करण्यात आली. जवळपास तेरा क्विंटल चे अण्णदान चोहोट्टा बाजार येथिल नागरीक व्यापारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातून करण्यात आले. तर गाडी मालकांनी त्यांचे वाहने भजनी दिंड्या एकत्रित करण्यासाठी रवाना केल्या. महिला पुरुष तरुण मंडळीनी महादेव संस्थान, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ग्रामपंचायत भवन येथे महाप्रसादाच्या तयारीला लागले. 
नियोजित वेळेत दुपारी १:३० मिनिटांनी श्री ची आरती ला सुरुवात झाली तर विसर्जन मिरवणूक साठी दुपारी २:०० वाजता श्री ना रथात स्थानापन्न करण्यात आले, गावातील महिलांनी सडा सारवण करत घरासमोर रांगोळी काढल्या होत्या. तरुण मंडळी ढोल ताशा डि जे च्या तालावर थिरकत होते. सामाजिक कार्यकर्ते यांनी विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तर काही ठिकाणी भाविकांना चहा ची व्यवस्था करण्यात आली होती. पर्यावरण, शांतता, सद्भावना,सलोखा, सामाजिक एकात्मता, स्त्रीभ्रूणहत्या संदर्भात जनजागृती पर बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येऊन सायंकाळी ६:३० वा. चोहोट्टा बाजार चे प्रथम नागरिक सरपंच सुभाषकाका मुकुंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येऊन गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात चोहोट्टा बाजार वासियांनी गणरायाचा निरोप घेतला.श्री चा रथ गांधिग्राम कडे रवाना झाल्या नंतर हजारो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या नंतर विविध ठिकाणांहून आलेल्या ढोलाच्या दिंडी मंडळाचे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सहभागी भजणी मंडळाला एक छांज नारळ दुपट्टा देऊन गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments