शासनाने जाहीर केलेली पैसेवारी ही फसवी आहे व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, प्रशासनाने जाहीर केलेली ६१ पैसेवारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे अशी आहे अंतिम पैसेवारी काढताना ५० पेक्षा कमी काढावी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो एकरावरील कपाशी व सोयाबीनचे पीक वाहून गेले. यलो मोझॅक मुळे सोयाबीन पिकाची वास्तविक परिस्थिती अत्यंत वाईट आहे, निसर्गाच्या अवलीपणामुळे व नको तेव्हा पडणाऱ्या धो धो पावसामुळे पीक रोगराई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या काळात शासनाला शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, परंतु या उलट प्रशासनाने ६१ पैसेवारी काढल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे जिल्ह्याची पिक परिस्थिती बघता पैसेवारी ही ५० पेक्षा कमीच निघणे अपेक्षित होते. शासनाने सुधारित व अंतिम पैसेवारी काढताना चूक सुधारावी.
यवतमाळ जिल्हा हा माळरान भाग असल्यामुळे शेकडो एकर जमीन पुरामुळे खरडून गेली, शेकडो एकर जमिनीवरील पिकाची वाढ खुंटली, प्रामुख्याने कापूस, तुर, ज्वारी, सोयाबीन पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यावर असमान कोसळले आहे. त्यात बँकांचे कर्ज सावकारांची कर्ज यामुळे शेतकरी राजा अतिचिंतित आहे मागील सरकारने शेतकऱ्यांना नियमित कर्जदारांना ५०,०००/- रुपये पन्नास हजार रुपये देण्याचे कबूल केले होते तेही मिळाले नाही, विदर्भातील प्रमुख सणापैकी नवरात्र उत्सव हा यवतमाळ येथील भारतात नावाजलेला उत्सव आहे. या उत्सवात शेतकऱ्यांच्या घरात गोडधोड शिकणे ऐवजी कर्जाच्या परतफेडीचे चिंतन चालू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपणाकडून खूप अपेक्षा आहे आधीच यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे अशात वरून राजाने शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे त्यात खाजगी बँका व सावकारांचे कर्ज यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट १,००,०००/- एक लाख रुपये हेक्टरी मदत द्यावी जेणेकरून येणारा नवरात्र उत्सव तरी साजरा करता येईल व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत कुठलीही आर्थिक मदत मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांना हेक्टरी १,००,०००/- एक लाख रुपये मदत द्यावी. समोर दिवाळी सारखे सणासुदीचे दिवस येत आहे आणि शेतकरी राजा अतिवृष्टीने बेजार झाला आहे आपणाकडून जिल्ह्यातील जनतेला त्वरित प्रतिसादाची अपेक्षा आहे. अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देवा भाऊ शिवरामवार, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पोटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद अब्दुल रहेमान, अँड. अमित बदनोरे शहर अध्यक्ष यवतमाळ , अभिजीत नानवटकर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व इतर उपस्थित होते
0 Comments