Advertisement

जळगाव जामोद येथे उपविभागीय कार्यालय समोर एक दिवशीय धरणे आंदोलन

प्रतिनिधी
जळगाव जा.:- २२ जुलै ला जळगाव जामोद/संग्रामपूर तालुक्यात ढगफुटी झाली त्या ढगफुटीमुळे नदी नाल्यांना पाणीच पाणी वाहू लागले महापुरासारखे विदारक वास्तव तयार झाले होते.नदीकाठच्या व लहानसाहान नाल्यांवरच्या शेत्या पिकांसह खरडूनच नाही तर १०/१५ वर्ष निकृष्ट राहतील अशा स्वरूपाच्या झाल्या झाल्या कोणत्याही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेले तर खड्डेच खड्डे दिसतील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधुन नद्यांचे प्रवाह पडले एवढी पिकाची व शेतीची नुकसान होऊन शेतकऱ्याला एक रुपयाची आर्थिक मदत सरकारकडून मिळालेली नाही.तसेच या पुरामुळे दोन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. अनेकांची घरदारे पडली कुटुंबचे-कुटुंब बेघर झाली काहींच्या घरी पाणी प्यायला ग्लास सुद्धा राहिला नव्हता. काहींचे कुटुंबे रस्त्यावर आली एवढा कठीण प्रसंग उद्भवला होता. अशा या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन थोडाफार का होईना बेघर गरजूंना जीवन आवश्यक किटचे वाटप केले, कोणी जेवण दिले, काहींनी थोडाफार आर्थिक सहारा दिला, व अनेकांनी होईल तेवढी मदत केली. परंतु सरकारने मात्र सानुग्रह अनुदान वाटत असतांना अनेक गरजुंना अनुदानापासून वंचित ठेवले. हे गरीब गरजू अजूनही सानुग्रह मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
अशा या महाभयंकर पुरामध्ये काही शेतकऱ्यांची गुरेढोरे, शेती उपयोगी साहित्य काहींची दुकाने वाहून गेली याची सुद्धा आजपर्यंत कोणतीच आर्थिक मदत मिळाली नाही. आम्हा पुरग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी यासाठी गरजू लोक उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद,तहसील कार्यालय जळगाव जामोद, संग्रामपूर येथे कागदपत्रे घेऊन कार्यालयाकडे जात आहे. परंतु शासन मात्र आमच्या लक्ष द्यायला तयार नाही अशा भावना पूरग्रस्तांच्या आहे.या पूरग्रस्तांच्या मागण्या रास्त असून त्यांना आर्थिक मदत द्या ही मागणी घेऊन घेऊन आज दिनांक ३ ऑक्टोबरला युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद येथे शेतकरी,पूरग्रस्तांच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्याकरता एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments