ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची नुकसान भरपाई व सरसकट कर्जमाफी द्या:- संभाजी ब्रिगेड यांच्याकडून मागणी
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
१४ ऑक्टोंबर रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी १ लाख रुपयांची नुकसानभरपाई व सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर असे की सण २०२३-२४ मधे शेतकऱ्यांची खूप आर्थिक हानी झाली असून सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.निसर्गाचा समतोल ढासाळल्यामुळे शेतकरी पार उद्ध्वस्त झाला आहे.ऐन सणासुदीच्या काळात दसरा दिवाळीत शेतकऱ्यांचे सोयाबीन पूर्ण मातीमोल झाले.सोयाबीनला कोंब येऊन सोयाबीन खराब झाले.शेतकऱ्यांचा दिवाळीचा आनंद हा दुःखात परावर्तित होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.बी-बियाणे फवारणी, खते,मजुरी यांच्या विळख्यात शेतकरी अडकला असून मुलाबाळांचे शिक्षण,सणासुदीत नवीन कपडे घेण्याचे स्वप्न अधुरेच राहिले...
सरकार हे जनतेचे मायबाप असते म्हणून आमची आपणाकडे मागणी आहे की कोणत्याही अटी शर्तीचे निकष न लावता तत्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत करावी व शेतकऱ्यांची पूर्णतः कर्जमाफी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना जगण्याची नवी उमेद निर्माण होईल.अन्यथा शेतकऱ्यांना जीवाचे काही बरे वाईट केल्या शिवाय पर्याय उरणार नाही.कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांना कर्जमाफी करून व ओला दुष्काळ जाहीर करून जगण्याची नवी उमेद द्यावी तसेच विमा कंपनीने तक्रार करण्या संबंधित यंत्रणा कार्यान्वीत ठेऊन केळी पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रभर हजारो शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष बुलढाणा (उत्तर) अमर रेमश पाटील,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन सोळंके,नांदुरा तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे,संजू पाटील,विजय पाटील,शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,विद्यार्थी आघाडी लोणवाडी शाखाध्यक्ष अभिषेक सोळंके,सौरभ केदार,सोपान डाबेराव,अमोल जुमडे,गौरव नारे,विनायक वाघ,पुरुषोत्तम भातुरकर,शांताराम बेलोकर,ऋषिकेश वसाने, जनुजी काटोले,ज्ञानेश्वर काटोले,श्रीकृष्ण मनस्कार,मुकुंदा ढोले,संतोष जुणारे,शुभम फासे यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते
0 Comments