Advertisement

विद्याभारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावती द्वारा संचालित मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे वर्ग 10वी विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न

विद्याभारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावती द्वारा संचालित मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव या आमच्या विद्यालयात आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र 2025-26 एसएससी बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या यानिमित्त त्यांचा मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव इथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता

 यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक श्री ऋषिकेश हवालदार सर श्री ताळे सर यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले यावेळी सन्माननीय मुख्याध्यापक श्री सोळंके सर ज्येष्ठ शिक्षक श्री डब्ल्यू इंगळे सर ज्येष्ठ शिक्षिका सौ घोटेकर मॅडम कुमारी राजपूत मॅडम व्यासपीठावर उपस्थित होते आपले मनोगत व्यक्त करताना सन्माननीय मुख्याध्यापक यांनी आपल्या विद्यालयाची झालेली प्रगती शैक्षणिक विकास याबद्दल माहिती दिली तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री एस डब्ल्यू इंगळे यांनी दहावीनंतर कुठलं क्षेत्रामध्ये जायचे आणि नोकरीची संधी कुठे आहे याचे मार्गदर्शन केले यावेळी श्री डी के सर श्री बोंबटकर सर श्री उमेश पाटील सर श्री अतुल पाटील सर श्री कुलट सर शिपाई विशाल वसूलकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन सुद्धा इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीने केले आनंदाच्या वातावरणात हा निरोप समारंभ संपन्न झाला

Post a Comment

0 Comments