Advertisement

स्व. बबनराव ठोंबरे यांच्या स्मरणार्थ व श्री. शंभू महादेव यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांना पाणपोईच्या माध्यमातून अखंडित १६ वर्षे सेवा केली

 उंबरे (द) मधील सामाजिक कार्याचा आढावा घ्यायचा म्हटले तर काही समाज प्रेमी असे आहेत की त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाला आतापर्यंत दिले आहे. त्यातील एक उंबरे (द) गावचे अहिल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर तरंगे. आपल्या रोजच्या व्यस्त जीवनातून समाजासाठी वेळ काढून प्रत्येक वर्षी समाजासाठी नवीन काहीतरी उपक्रम राबवणारे ज्ञानेश्वर तरंगे यांनी स्व. बबनराव ठोंबरे यांच्या स्मरणार्थ व श्री. शंभू महादेव यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांना पाणपोईच्या माध्यमातून अखंडित १६ वर्षे सेवा केली


. या कार्यासाठी उस्मानाबाद चे खासदार श्री. रवींद्र गायकवाड यांनी शंभू महादेवाची भातंगडी ते उंबरे  (द.) पायी चालत वारी पूर्ण करून पाणपोई च्या उद्घाटनासाठी उपस्थिती दर्शविली होती. त्यावेळी श्री. ज्ञानेश्वर तरंगे यांच्या अध्यक्षेखाली भाविकांच्या सोयीसाठी महादेव मंदिरासमोर पूल होण्यासाठी प्रथम निवेदन देण्यात आले होते. त्याला यश आता आले आहे. तसेच सोलापूर जिल्हा विद्यमान पालक मंत्री यांनीही स्वतः भेटून या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच आत्तापर्यंत अहिल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. आपल्या कार्यातून आपली पोचपावती भेटत असते. हे श्री. ज्ञानेश्वर तरंगे यांच्या कार्यातून दिसून येते.

Post a Comment

0 Comments