जळगांव जामोद:- दिनांक १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सव्वापाच ते साडेपाच च्या दरम्यान उसरा चालठाणा बस सेवा विद्यार्थी व विद्यार्थीनी साठी नियमित पणे जळगांव जामोद बस आगाराची बससेवा असते हि बस सुनगांव मार्गे चालठाणा उसरा जाते यामध्ये जळगांव जामोद ला येणारे शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी हे भरपूर प्रमाणात असतात त्याचप्रमाणे सुनगांव येथिल विद्यार्थी सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत सुनगांव येथिल विद्यार्थ्यांकरिता जामोद मार्गे सगोडा व इतरही बऱ्याच बसेस आहे परंतु संध्याकाळी विद्यार्थी हे घरी लवकर जाण्याच्या उद्देशाने चालठाणा उसरा या बस मध्ये जात असल्याने दोन्ही गावाचे विद्यार्थी मिळुन हि संख्या बसच्या मर्यादेपेक्षा जास्त होते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बरेच वेळा जागेवरून किरकोळ वाद होतात आज तीच परिस्थिती निर्माण झाल्याने सुनगांव येथिल विद्यार्थी बस मध्ये सुरूवातीला चढल्याने चालठाणा उसरा येथिल बरेच विद्यार्थी खालीच राहले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाला व बस पुर्ण भरल्याने बस निघुन गेली आणि चालठाणा उसरा येथिल विद्यार्थी बसमध्ये न जाता बसस्टँडवरच राहिले व सरळ पोलिस स्टेशन कडे धाव घेतली कर्तव्यावर हजर असलेले सबइंस्पेक्टर सरकटे साहेब व शेगोकार साहेब क्षणाचाही विलंब न करता बसआगारात पोहचले त्याच वेळी चालठाणा उसरा येथिल काही विद्यार्थी वंचित बहुजन आघाडी चे सुनिल बोदडे यांना भेटून हि सर्व परिस्थिती सांगितल्या नंतर ते सुद्धा बसआगारात पोहचुन आगार प्रमुख यांना फोनवर संपर्क साधुन चौकशी केली असता ते अधिकारी सुटिवर असल्याने घरि असल्याचे त्यांनी सांगितले त्या नंतर कर्तव्यावर असणारे बस आगार कर्मचारी यांच्याशी पोलिस सबइंस्पेक्टर सरकटे साहेब , शेगोकार साहेब, सुनिल बोदडे व पत्रकार अनिल भगत यांनी चर्चा करून कर्मचारी त्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे सर्व विद्यार्थी खुश जाणून होऊन त्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता नंतर विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक, आगार प्रमुख, ड्रायव्हर, कंडक्टर आणि पोलिस कर्मचारी आणि वंचित बहुजन आघाडी चे सुनिल बोदडे तसेच पत्रकार अनिल भगत यांचे आभार मानले
0 Comments