Advertisement

ग्रामीण पत्रकारांना न्याय देण्याला प्राधान्य-यदु जोशीअधिस्विकृतीचे सदस्य यदु जोशी यांचा सत्कारअ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे आयोजन

प्रतिनिधी
राज्य अधिस्विकृती समीतीचे अध्यक्ष असतांना पहिल्या कार्यकाळात आपण पत्रकारांच्या विविध समस्या शासनाच्या माध्यमातून सोडविल्या.समाजात दोन बाजु असतात एक "आहे रे" तर दुसरी "नाही रे" त्या काळात आपण अधिस्विकृतीचे अध्यक्ष या नात्याने "आहे रे" साठी काम केले आता "नाही रे" साठी काम करायचे आहे. त्यावेळेस ज्या उणीवा राहिल्या त्या या नविन टर्म मध्ये दूर करण्याचा प्रयत्न करणार असून यात पत्रकारांच्या संघटनाकडुन मार्गदर्शन घेऊन त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीन यात ग्रामीण पत्रकारांना पुरेपुर न्याय देण्याला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही राज्य अधिस्विकृती समीतीचे नवनियुक्त सदस्य यदु जोशी यांनी दिली.ते अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाने अमरावती येथील प्राईम पार्क येथे आयोजित सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.
   यावेळी मंचावर विभागीय अधिस्विकृृती समीतीचे नवनिर्वाचीत सदस्य,वृत्तकेसरीचे संपादक जयराम आहुजा,अमरावती विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख प्रा.हेमंत खडके,अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रिय अध्यक्ष मनोहर सुने,कार्याध्यक्ष युसुफखांंन, महासचिव सुरेशराव सवळे, प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख,यांची उपस्थिती होती.यावेळी यदु जोशी,जयराम आहुजा व प्रा.हेमंत खडके यांचा पत्रकार संघाच्या केंद्रिय पदाधिकारी व प्रदेशाध्यक्ष यांनी शाल,पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
   यदु जोशी पुढे बोलतांना म्हणाले की,बोलणे आणि प्रत्यक्ष काम करणे यात खूप फरक आहे. इतरांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःकडे आधी पहावे, समाजजागृतीचे काम पत्रकारांना करावयाचे आहे.आव्हानात्मक परिस्थितीत प्रिंट मीडियाने आपली विश्वासार्हता कायम ठेवली आहे. मात्र आत्मचिंतनाची आज अधिक गरज आहे. पत्रकारिता क्षेत्र इतके सुंदर आहे, की तुम्ही जे मिळवाल, त्याची पैशात किंमत देखील मोजता येणार नाही. प्रसार माध्यमांनीच समाजातील अनेकांना घडवले आहे. आधी चांगले होण्याचा प्रयत्न करा तरच मोठे देखील व्हाल, आणि आधीच असल्याचा अहंम बाळगला तर चांगले होण्याची देखील शाश्वती राहत नाही. असे महत्वपुर्ण उदबोधन त्यांनी केले.प्रसार माध्यमांना कायद्याची बंधने आहेत, मात्र सोशल माध्यमांना नाही. प्रसारमाध्यमांनी मिळविलेली विश्वासाहर्ता ही काही एकाएकी मिळालेली नाही, तर त्यासाठी कितीतरी वर्षाची तपस्या करावी लागली. लोकांमध्ये रहा, लोकांकडुन समस्या जाणून घ्या व आपल्या लेखनीद्बारे समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय द्या.प्रामाणिक लेखनीत मोठी ताकद आहे.हीच लेखनी आपली व वृत्तपत्राची प्रतिमा व प्रतिभा उंचावण्यास सहाय्यभुत ठरते.यावेळी त्यांनी आपल्या पित्याच्या आदर्शावरच आपण हलाख्याचे परिस्थितीचा सामना करत आज या पदावर पोहोचल्याचे सांगीतले यावेळी ते भावुक झाले होते.प्रामाणिक पणाचे उदाहरण देतांना ते म्हणाले की नोकरी करीत असतांना ज्या प्रमाणे पहिल्या पगाराची प्रतिक्षा करतो तो प्रामाणिक आणि आजही जो पगाराची प्रतिक्षा करीत नाही त्याच्यात भ्रष्टाचाराची शंका घेण्यास वाव मिळतो.असे महत्वपुर्ण उदाहरण दिले.आपल्या या आधीच्या अधिस्वाकृती अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील कार्याबद्दल बोलतांना जोशी म्हणाले की,ज्या पत्रकाराचे वय ५० आणि पत्रकारीतेतील सेवा २० झाली त्यांना शासनाने अधिस्विकृती देण्याचे परिपत्रक काढले.मात्र परिपत्रक रद्द केल्याचे नव्याने परिपत्रक न काढता याची अमलबजावणी स्थगीत केली.ही अमलबजावणी सुरु करण्यासाठी प्रयत्न केले मात्र सरकारच बदलले आणि प्रकरण प्रलंबित राहीले.यासाठी पुन्हा प्रयत्न करणार असून यावेळी ग्रामीण पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना शासनाच्या अधिस्विकृतीसह इतर योजनांचा लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार असून यासाठी अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे मार्गदर्शन घेऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही यदु जोशी यांनी दिली.पत्रकार कल्याण मंडळ स्थापन करण्याची मागणी या दरम्यान अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन यदु जोशी यांना दिले त्यात पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर सुने यांनी पत्रकारांसाठी पत्रकार कल्याण मंडळाची स्थापना करण्याची मागणी रेटुन धरली,या मंडळाच्या माध्यमातुन पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबाला मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली.या मागणीला जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या टर्म मध्ये हा मुद्दा प्रामुख्याने शासन दरबारी मांडुन पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.या समारंभाला अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव अशोकराव पवार,केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदिप जोशी, केंद्रीय पदाधिकारी माणिक ठाकरे,अशोक यावूल,महिला मंच अध्यक्षा जयश्री पंडागरे,राज्य प्रवक्ता प्रा.रविंद्र मेंढे, राज्य सरचिटणीस बाळासाहेब सोरगीवकर, राज्य कार्यलय प्रमुख बाबाराव खडसे ,प्रसिध्दी प्रमुख सागर सवळे,राज्य पदाधिकारी व प्रदिप पंडागरे,निलेश राजस यांची उपस्थिति होती.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पत्रकार संघाचे प्रदेश प्रवक्ता रविंद्र मेंढे यांनी केले तर वरील कार्यक्रम दिनांक १९/८/२०२३ शनिवार रोजी प्राईमपार्क अमरावती येथे संपन्न झाला

Post a Comment

0 Comments