Advertisement

पुरग्रसत व अतिक्रमण धारकांना न्याय देण्यात यावा वंचित चे रतन नाईक यांची मागणी

प्रतिनिधी नागेश भटकर
जळगांवजामोद:-जळगांव जामोद तालुक्यात व जळगाव जामोद शहरात दिनाऊ 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे सर्व नदि नाल्यांना महापूर आला होता यामहापुरामध्ये अनेक लोकांची घरे दारे वाहून गेली त्यातच काही लोक हे अतिक्रमण करून अनेक वर्षापासून नदिनाल्यांच्या काठी राहतात या अतिक्रमित राहणाऱ्या नागरिकांना या महापुरामुळे खूप मोठे नुकसान सोसावे लागले अनेकांचा संसार हा रस्त्यावर आला आणि यासंदर्भात तहसील कार्यालयात जाऊन तहसिलदार मॅडम  यांना संदर्भात विचारणा केली असता त्या म्हणतात की ज्या लोकांकडे नमुना 8 किंवा नमुना 43 आहे अशाच लोकांना सानुग्रह अनुदान देता येईल आणि जे लोक अतिक्रमण करून राहतात त्यांना आपल्याला सानुग्रह निधी देता येणार नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष रतन नाईक यांनी माननीय तहसीलदार मॅडम यांना चांगले धारेवर धरले नंतर तहसीलदार मॅडम यांनी मी स्वतः अतिक्रमित राहणाऱ्या लोकांच्या संदर्भात पॉझिटिव असून वरिष्ठ लेवलला या सर्व लोकांना कशाप्रकारे न्याय देता येईल करिता पाठपुरावा करून या लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी उपस्थित पुरपिडितांसमक्ष व वंचित बहुजन आघाडी चे माजी तालुका अध्यक्ष रतनभाऊ नाईक, तालुका उपाध्यक्ष सुनील बोदडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तायडे, महिला आघाडीच्या पार्वताबाई इंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत अवसरमोल, युवा आघाडीचे संतोष पवार यांच्या समक्ष आश्वासन दिले यावेळी शहरातील व तालुक्यातील पुरपिडित बांधवांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली .

Post a Comment

0 Comments