प्रतिनिधी : नागेश भटकर
जळगांव जामोद तालुक्यातील सरपंचांची पंचायत समिती समोर उघड्यावरच बैठक संपन्न*
जळगांव जामोद तालुक्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे निर्माण झालेल्या विवीध समस्या व गट विकास अधिकाऱ्याची आपत्ती काळातील कमालीची उदासीनता या बाबत सरपंच संघटनेची दिनांक ७ ऑगस्ट रोजी बैठक पार पडली. सदर बैठक ही पंचायत समिती सभागृह येथे नियोजित होती परंतु जळगांव जामोद पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी संजय पाटील यांनी कर्मचाऱ्यास सभागृह उघडण्यास मज्जाव केला व सदर सभागृह सरपंचांसाठी नसून केवळ अधिकाऱ्यांसाठी असल्याचे उत्तर दिले. परिणामी आपत्ती व्यवस्थापन व इतर महत्वाचे विषय असलेली बैठक पंचायत समिती समोरील उघड्या जागेत घ्यावी लागली. विशेष म्हणजे २२ जुलै रोजी झालेल्या महापुरा नंतर गट विकास अधिकारी यांनी एकाही गावाला भेट दिली नाही. व कोणत्याहि पीडितास विचारना केली नाही यावेळी बोलतांना संघटनेचे अध्यक्ष श्री राजेश सित्रे पाटिल यांनी सदर गट विकास अधिकारी केवळ कमिशन मिळेल अश्या फाईल वर सह्या करण्या साठी नियुक्त असून bdo पंचायत समिती जळगाव येथे येत नसल्याने नागरिकांच्या समस्यांबाबत पूर्णपणे उदासीन असल्याचे मत व्यक्त केले. चार्ज असल्यापासून गटविकास अधिकारी फक्त 6/7 वेळा 15 ते 20 मिनिटांसाठी पंचायत समिती समोर उभे राहून गेले आहेत,एवढ्या मोठ्या आपत्तीच्या वेळी पूर्णपणे गैरहजर राहणे व सरपंचांच्या बैठकीला उपस्थिती तर नाहीच पण बसायला जागा पण न देणे हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे मत सरपंच सौ वर्षाताई वाघ यांनी व्यक्त करून मी खूप जुना माणूस आहे माझे ceo सुद्धा वाकडे करू शकत नाही, माझ्या डोक्यावर राजकीय हात असून मला कोणी काही बोलेल तर सरपंच याना जेलमध्ये टाकीन ,संग्रामपूर मध्ये एकही सरपंच माझ्यासमोर उभे राहण्याची हिम्मत करत नाही असे वक्तव्य करीत असतात अशी चर्चा ऐकायला मिळाली,
जेष्ठ सरपंच श्री. विष्णु इंगळे यांनी तात्काळ या गट विकास अधिकारी यांचा प्रभार काढून पुर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी केली. सोबतच 24 तास दारूच्या नशेत असलेला bdo या पस ला नको अशी मागणी करण्यात आली, आसलगावत सर्वात जास्त नुकसान झाले, हाकेच्या अंतरावर तालुक्यापासून हे गाव आहे परंतु या अधिकाऱ्याने साधी भेट तर सोडा सरपंच सोबत सम्पर्क करून साधी विचारणा केली नाही, खासदार आमदार ceo आले पण हा अधिकारी दिसला सुद्धा नाही co च्या भेटी दिवशी हा अधिकारी दिसला,असा bdo नाही पाहिजे,आपत्ती व्यवस्थापन सोडून गटविकास अधिकारी राजकारणात दंग असल्याचा सुर सरपंचांमध्ये दिसुन आला.
सदर बैठकीला तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत मुख्यत्वे
अतिवृष्टीमुळं बाधित लोकांच्या समस्यां, पंचनामे ,सदर आपत्ती व्यवस्थापन मध्ये ग्राम पंचायत मार्फत झालेला खर्च चा परतावा, जिल्हा परिषद/ पंचायत समिती प्रशासनाकडून ग्राम पंचायत ला नैसर्गिक आपत्तीत मिळणाऱ्या मदत , नैसर्गिक आपत्ती नंतर पाणीपुरवठा व स्वच्छ्ता चे निर्माण झालेल्या समस्या व त्यावरील उपाययोजना, गावातील लोकांना घरकुल लाभ मिळवून देणे करिता नियोजन करणे, नदी काठी-नाल्या काठी राहत असलेले व पूरग्रस्त लोकांचे पुनर्वसन व पर्यायी जागेसह घरकुल, गाव रस्ते, शेत रस्ते व शेती च्या विविध समस्यां, ग्रामपंचायतीच्या विविध अडीअडचणी व त्यावरील उपाययोजना इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.
*तसेच जळगांव जामोद पंचायत समिती च प्रभार या गट विकास अधिकारी कडून तातडीने काढून पूर्ण वेळ देणारा अधिकारी देण्याची ची मागणी आमदार संजय कुटे व जी प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करावी व यासह इतर ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले.यावेळी तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments