Advertisement

महाळुंगी मंडळाचे मंडळ अधिकारी रवी पाटील यांच्याकडून कामात हलगर्जीपणा शेतकऱ्यांना होतोय नाहक त्रास

महाळुंगी मंडळाचे मंडळ अधिकारी रवी पाटील यांच्याकडून कामात हलगर्जीपणा शेतकऱ्यांना होतोय नाहक त्रास
नांदुरा प्रतिनिधी शिवचरण पाटील
  नांदुरा तहसील अंतर्गत येणाऱ्या महाळुंगी मंडळाचे मंडळ अधिकारी श्री रवि पाटील यांच्याकडून कामांमध्ये हलगर्जीपणा करत असल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांकडून तसेच महाळुंगी मंडळ मध्ये काम करत असणारे तलाठी यांच्याकडून मिळाली आहे. कामाची चिरीमिरी दिल्याशिवाय काम होणार नाही आणि नाही दिले तर काम वेळेवर होणार नाही अशी गत या मंडळ अधिकाऱ्यामुळे झाली आहे. 
      उपरोक्त माहितीनुसार नांदुरा तालुक्यातील महाळुंगी मंडळाचे मंडळ अधिकारी श्री रवि पाटील यांच्याकडून कामांमध्ये हलगर्जी होत असल्याची माहिती अनेक शेतकरी आणि या मंडळामध्ये काम करत असणारे तलाठी वर्गाकडून मिळाली आहे. वेळेवर काम न करणे, वेळेवर शेतकऱ्यांच्या नोंदी ची फेरफार न घेणे, वारस लावण्याचे वा काढण्याचे फेरफार वेळेवर न घेणे अशा एक ना अनेक कामांमध्ये हलगर्जीपणा करत असल्याची माहिती तसेच एखाद सरळ काम चिरीमिरी दिल्याशिवाय होणार नाही अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. त्यांच्यासोबत फोनवरून संपर्क केल्यास मी मीटिंगमध्ये आहे, तुमचे काम होऊन जाईल, तुमच्या कामाला तीन,चार दिवस लागतील अशी उडवा उडवी चे उत्तर देखील त्यांच्याकडून मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. अशा अधिकारी लोकांना सरकारी पगार असून सुद्धा शेतकऱ्यांकडून चिरीमिरीची अपेक्षा ठेवत असून यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात येत आहे तरी माननीय तहसीलदार साहेब यांनी या गोष्टीचा आढावा घेऊन या अधिकाऱ्याला समज द्यावा असा सुर शेतकरी वर्गातून आणि अधिकारी वर्गातून येत आहे.

Post a Comment

0 Comments